Samatol Foundation
SAMATOL FOUNDATION, is a social organisation established in 2006, working for runaway children foun A variety of reasons bring children to Mumbai.
Samatol Foundation, is a registered NGO, established in 2006, rescuing run away children on railway platforms in Mumbai. Family crises, academic failure, child labour, attraction of film industry are some of them. Most of these children stay on railway platforms and fall in bad hands. They invariably get addicted to substances and some even turn to criminal activity. Samatol Foundation makes frien
*रस्त्यावरच्या मुलांची गो शाळा*
कहाॅ कहाॅ से आते है असे आपण अनेक वेळा ट्रेन मध्ये ऐकले असेल कोणीतरी भिख मागताना किंवा झाडु मारताना एखाद्या मुलाला लोक गर्दी मध्ये ओरडत असतात स्टेशनवर तर भंगार गोळा करणाऱ्या अनेक मुलांना बघितले असेल रस्त्यावर सिग्नलला अनेक मुले आणि मोठी माणसे सुद्धा दिसतात कोण आहेत ही लोक कुठुन आली आहे असा प्रश्न कधीतरी पडला असेलच ना
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समतोल फाऊंडेशन ने 20 वर्षे अगोदरच शोधली आहे त्यांची माहिती घेऊन त्यांचे मनपरिवर्तन सुद्धा केले आहे आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त मुलांना या चक्रातून बाहेर काढून समाजाच्या प्रवाहात आणले आहेत आजही सातत्याने या समस्येचा शोध सुरू असतोच कधी सरकार शासन मदतीसाठी येते तर कधी आडकाठी घालते परंतु समाज मात्र या विषयावर मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेत असतो.
खरतर या मुलांच्या चांगल्या सवयी कडे समाज आणि यंत्रणा दुर्लक्ष करीत असतात पण वाईट गोष्टी कडे जास्त प्रमाणात लक्ष देतात पण मुले ही मुलेच असतात ती जन्मताच गुन्हेगार नसतात ती चांगली बनु शकतात ते शिकु शकतात आणि हे सर्व शक्य आहे जे आम्ही सातत्याने करत आहोत
ही मुले स्वभावाचे चिडचिडी असतात पण ती बाहेर राहिल्यामुळे झालेली असतात मेहनती असतात अनेक कला कौशल्य अंगीकृत असतात घाबरट नसतात काटक असतात याची बौद्धिक क्षमता खूप जास्त असते मानसिक कमजोर नसतात जिद्दी असतात आणि या सर्व गुणांमुळे ते बाहेरच्या उघड्या जगात राहु शकतात
वाईट गोष्टी तर ज्या वातावरणात ते राहतात किंवा राहत असल्याने घडत असतात यांचा वयोगट 12 ते 18 च्या आसपास असतो याच मुलांच्या चांगल्या एनर्जीचा उपयोग समतोल फाऊंडेशन करते आणि त्यातुनच उभी राहिली समतोल गो शाळा
(गो रक्षा व गो वंश सेवा केंद्र)
गेली १०० महिने म्हणजे ८ वर्षे ४ महिने गोशाळा सुरू आहे २०१८ कोवीड सुरू होण्यापूर्वी समतोलच्या स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात सहजपणे एक गो माता आश्रयाला आली कदाचित तिला काळजी व सरंक्षण या ठिकाणी मिळेल असे वाटले असावे बराच शोध घेतला तरी कोणी गो मातेचा मालिक नेण्यासाठी आला नाही देवाच्या इच्छेनुसार आम्ही चारा पाणी देत होतो नंतर आम्हाला कळाले की गायीच्या पोटात वासरू सुद्धा आहे याच दरम्यान अनेक मुलांना गायीचा लळा लागला प्रेम जडले मुले गायीची क्षणाक्षणाला काळजी घेऊ लागले याच दरम्यान वासरू सुद्धा झाले कोवीडच्या काळात तर मुले जास्तच काळजी घेत होती कारण समतोल फाऊंडेशन हरवलेल्या मुलांना कुटुंबात जोडण्याचे व पुनर्वसनाचे कार्य करीत आहे पण कोवीड दरम्यान मुलांना घरी सोडवता आले नाही दोन वर्षे मुले अडकुन होती यामध्ये आजुबाजुला असणारे अनेक लोकांना माहिती झाली आणि ज्या शेतकऱ्यांना गायी नको होत्या त्यांनी आमच्या कडे आणायला सुरुवात केली बघता बघता २०/२५ गो माता झाल्या
समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र मामणोली कल्याण या ठिकाणी आहे निसर्गाच्या सान्निध्यात आहे बाजूला जंगल आहे नदी आहे त्यामुळे गायी चरायला जाऊ लागल्या आनंदाने मुले गायी चारत होत्या दुध लोणी तुप खवा मिठाई सगळच मुलांना मिळत होते हे सगळे बघुन गावातील तरूण यतेश कोर यांनी स्वतः ची जमीन भाड्याने लीज वर देण्यासाठी पुढे आले त्याचप्रमाणे देणगीदार एस हरीहरन यांनी १२ लाख रुपये खर्च करून गोशाळा बांधुन दिली संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी केळकर ठाणे आमदार हे तर गोरक्षक च आहेत त्यांच्या संपर्कातील अनेक शेतकऱ्यांनी गो माता दानं केल्या आणि १०० च्या आसपास गो मातेची सेवा सुरू झाली
काही अनुभव नसतानाही आणि मनात काही नियोजन नसताना सुद्धा केवळ चांगल्या नितीमत्ता असल्याने गो शाळा सुरू झाली या सगळ्या गोष्टी काही लोकांना बघवत नाही म्हणून विरोधात सुद्धा गेले अनेकांनी बाल गो सेवक यांना मारले धमकावले गाया चोरण्याचा प्रयत्न केला गाया मारण्याचा प्रयत्न केला पण आम्ही या सगळ्या संकटातून मार्ग काढत गो शाळा चालवत आहोत
गोशाळा चालवताना सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे गो सेवक असणे होय अनेक गो शाळा मध्ये गाया आहेत पण संभाळणार कोण असा प्रश्न पडतो शेण गोमुत्र साफसफाई औषधे उपचार अनेक गोष्टी आहेत विशेष म्हणजे गायी वासरू देताना आणि दिल्यानंतरही काळजी घ्यावी लागते त्यासाठी गो सेवक फार महत्त्वाचे आहे देशी गाई कल्पतरू प्रमाणेच असतात जिवंत असताना आणि मृत्यू नंतरही तेवढ्याच उपयोगी गो माता असतात हे समजून घेणे आवश्यक व गरजेचे आहे याचा विचार आणि अभ्यास समतोल फाऊंडेशन च्या गो शाळा मधील मुलांना घेऊन प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे बाल गो सेवक प्रत्यक्ष कृती मधुन तयार होत आहे
आजच्या घडीला खूप सक्षमपणे काम सुरू आहे गो सेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या बरोबर जोडुन अनेक गोष्टी होत आहेत समस्त महाजन यांच्या सहकार्याने आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे चारा पाणी मिळतय पण यामध्ये महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य लाभले तर अनेक बालगृहातील मुलांचे भवितव्य गो सेवक म्हणून उदयास येऊ शकते
समतोल फाऊंडेशन ची ओळख खरतर मुलांच्या विकासासाठी आहे आता तर अनेक भेटायला येणारे बाल प्रेमी रस्त्यांवरील मुलांची गोशाळा म्हणून नवीन ओळख करून देत असतात
संपूर्ण महाराष्ट्रात बालगृहातील रस्त्यावर स्टेशनवर राहणाऱ्या मुलांना घेऊन अनेक गो सेवक म्हणून कार्य सुरू होऊ शकते याचे प्रशिक्षण वर्ग सुरू होऊ शकतात याबाबत संपूर्ण तयारी समतोल फाऊंडेशन मध्ये आहे शासन प्रशासन विभाग आणि यंत्रणा यांनी सहकार्य करण्याची गरज आहे
समतोल फाऊंडेशन
विजय जाधव
#
एक छोटासा प्रयत्न पुनर्वसनाचा
सामाजिक कार्याचा
समतोल फाऊंडेशन दादोजी कोंडदेव स्टेडियम गाळा नंबर 50 ठाणे पश्चिम संपर्क विजय जाधव 9892961124
समतोल फाऊंडेशन स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र कल्याण मुरबाड रोड मामणोली येथे निवासी अधिक्षक साठी जागा भरायची आहे अनुभव महत्त्वाचा आहे योग्य मानधन मिळेल संपर्क विजय जाधव 9892961124
11/05/2026
संवेदनशील यंत्रणा आहे का....
बालकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची ही आकडेवारी चिंताजनक आहे
कुठे चाललाय समाज अशा प्रश्न नक्कीच पडला असेल
शासन प्रशासन सरकार विभाग संस्था संघटना म़ंडळ समाज एकत्रित येऊन काम केले तरच समतोल राहणार आहे आणि एवढे सगळे करायला आमची यंत्रणा सक्षम आहे का?
20 वर्षे झाली आम्ही पुढे होऊन सरकारकडे रेल्वे स्टेशनवरील ट्रँफिकिंग मुलांच्या विषयावर परवानगी मागत आहे पण मिळाली नाही
खरच सरकार या विषयावर संवेदनशील आहे का? माहिती नाही पण खूप अवघड आहे
विजय जाधव समतोल फाऊंडेशन
आपली संस्कृती आपला समाज
आजही वंचित समाजाला दिशा देण्याचे काम करत आहोत पण याच समाजाच्या आधारावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले
या समाजाला सहकार्य मदत झाली पाहिजे त्यांचा मान सन्मान सत्कार केला पाहिजे
समतोल फाऊंडेशन समतोल कलामंच च्या माध्यमातून करतच आहे आपणही सहभागी होऊन आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मदत अपेक्षित आहे
विजय जाधव
9892961124
समतोल सेवा फाऊंडेशन अन्नछत्रात संपूर्ण कामाचे काॅडीनेशन करण्यासाठी काॅडीनेटर पाहिजे
समतोल फाऊंडेशन दादोजी कोंडदेव स्टेडियम गाळा नंबर 50 ठाणे पश्चिम संपर्क विजय जाधव 9892961124
अन्नदान सर्व श्रेष्ठ दान
19/04/2026
ठाणे वैभव मराठी पेपर Today या पेजला गेले तरी बघायला मिळेल
समतोल च्या माध्यमातून होत असलेल्या अन्नदान सेवेला आज अक्षय तृतीयाला 100 महिने म्हणजे 8 वर्षे 4 महिने होत आले सातत्याने चालणारी ही सेवा निरंतर प्रक्रिया आहे
अन्नदान सेवा ही सर्व श्रेष्ठ सेवा मानली जाते आपणही सहभागी होऊन सहकार्य करू शकता
सविस्तर माहितीसाठी लेख वाचा
विजय जाधव समतोल फाऊंडेशन
समतोल फाऊंडेशन निवासी कार्यकर्ता जागा भरायची आहे
मुलांच्या विकासासाठी काम आहे
कामाचा अनुभव आवश्यक आहे
सोशल वर्कर पोस्ट आहे मल्टी टाक्स असणार आहे
राहण्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे
समतोल फाऊंडेशन दादोजी कोंडदेव स्टेडियम गाळा नंबर 50
प्रकल्प व्यवस्थापन
स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र मामणोली कल्याण मुरबाड रोड हिंदू सेवा संघ कल्याण पश्चिम
टिप:-भेटी नंतरच मानधन ठरवले जाईल
संपर्क विजय जाधव समतोल फाऊंडेशन संस्थापक
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Dadoji Konddev Stadium, Gala No. 55, Khartan Road
Thane
400601