Khasmarathi

Khasmarathi

Share

खासमराठी हा मराठी लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळते.

27/04/2026

“मराठी असल्याचा अभिमान वाटतो कारण ___”

27/04/2026

“हा चित्रपट BLOCKBUSTER होईल का? 🔥
👉 YES / NO कमेंट करा आणि कारण पण सांगा!”

25/04/2026
25/04/2026

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, १ मे २०२६ पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा (वाचता आणि बोलता येणे) अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या चालकांना मराठी येणार नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
#रिक्षावाला #मुंबई #मराठीभाषा #मराठीमाणूस #संप

“संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील क 04/02/2026

https://www.khasmarathi.com/2026/02/blog-post.html

“संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील क संघर्षातून साकारलेली कविता : ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ – समाधान निकम यांचा संवेदनशील काव्यप्रवास”

27/12/2025

"तू माझ्या लायकीचा नाहीस संग्राम... आरश्यात चेहरा बघितलायस का तुझा? माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे..." भर कॉलेजच्या गेटवर सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पे_टत राहिला!
कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची 'फेव्हरेट लव्ह स्टोरी'. दहावीच्या निरोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं, "बाळा, परिस्थिती गरीब आहे ग माझी, पण तुला राणीसारखं ठेवेन. आपण लग्न करू." सायलीने लाजून होकार दिला होता.
शाळा संपली. सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला दोघे तासनतास फोनवर बोलायचे. संग्राम शेतात राबून, भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा.
पण शहराचा वारा सायलीला लागला. कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे, मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले. तिला तिच्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स भारी गिफ्ट्स देताना दिसायचे. तिला वाटू लागलं, "माझा बॉयफ्रेंड तर नुसता शेतकरी आहे, गावंढळ आहे. तो मला काय देणार?"
हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले. मेसेजला रिप्लाय उशिरा येऊ लागले.
एकदा संग्रामने कसाबसा पैसा जमवून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला. पण सायलीने फोन करून त्याला सुनावले, "संग्राम, काय हे चिंध्यांसारखे कपडे पाठवलेत? माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात. तुला स्टॅंडर्ड कळतं का रे?" संग्रामच्या मनाला खूप लागलं, पण प्रेमापोटी तो गप्प राहिला.
काही दिवसांतच सायलीने कॉलेजमधल्या 'रोहित' नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली. रोहित तिला कारमधून फिरवायचा, महागड्या हॉटेलमध्ये नेायचा. संग्रामला हे मित्रांकडून कळलं तेव्हा तो कोलमडला. तो रडत तिला फोन करू लागला, पण तिने नंबर ब्लॉक केला. त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणींचे नंबर मिळवले, त्यांना विनवण्या केल्या, "प्लीज ताई, एकदा माझं सायलीशी बोलणं करून द्या, मी तिच्याशिवाय मरून जाईन." पण त्या मैत्रिणींनी उलट त्याची चेष्टा केली.
संग्रामला राहवलं नाही. तो तसाच एसटीने पुण्यात आला. तिचा कॉलेजच्या गेटवर तासनतास उभा राहिला. दुपार झाली, सायली रोहितच्या कारमधून खाली उतरली. ती खूप मॉडर्न दिसत होती. संग्राम धावत तिच्या जवळ गेला.
"सायली..." त्याचे डोळे भरले होते.
तिने रागाने मागे वळून पाहिलं. "तू? इथे काय करतोयस भिकारड्यासारखा?"
संग्रामने तिचे हात पकडले, तो गुडघ्यावर बसला. "सायली, तोडू नकोस ग आपलं नातं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी मेहनत करीन, तुला हवं ते देईन, पण मला सोडून जाऊ नकोस." तो ढसाढसा रडत होता.
कॉलेजची मुलं जमा झाली. सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या. "हहाहा, सायली हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का ग?"
सायलीचा अहंकार दुखावला. तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली. "माझ्या जवळ येऊ नकोस. तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? गेट लॉस्ट!"
तेवढ्यात रोहित आला. "ए ए, कोण रे तू? माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस?" रोहितने आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संग्राम र_क्ताळला, कपडे फाटले, पण त्याची नजर फक्त सायलीवर होती. पण सायलीने एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली.
त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला. पण त्या अश्रूंसोबतच त्याच्यातल्या जुन्या 'प्रेमवेड्या' मुलाचा अंत झाला होता. त्याने ठरवलं, "आता प्रेम नाही, जिद्द पेटवायची. ज्या लायकीवरून तिने मला हिणवलं, तीच लायकी कमवून दाखवायची."
संग्राम गावी परतला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. शेतीसोबतच त्याने 'एमपीएससी'चा अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र एक केली. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही.
पाच वर्षानंतर...
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) लोकांची गर्दी होती. सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती. रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता. त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती.
शिपायाने नाव पुकारले, "मिसेस सायली रोहित कदम, साहेबांनी आत बोलावलंय."
सायली केबिनमध्ये गेली. ती रडवेली झाली होती. "सर, प्लीज आमचं घर वाचवा, ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ."
समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने फाईलवरून नजर वर केली. ते भेदक डोळे, तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता.
तो 'संग्राम' होता. आता तो 'उपजिल्हाधिकारी' (Deputy Collector) झाला होता.
सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे शब्द तोंडातच अडकले. "संग्राम... तू?"
संग्रामने शांतपणे पेन उघडलं. तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागावला नाही. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त कर्तव्य होतं.
त्याने फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली.
सायलीला रडू कोसळलं. "संग्राम, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. त्या रोहितने मला बर्बाद केलं. तुझं प्रेम..."
संग्रामने हात वर करून तिला थांबवलं. "मॅडम, तुमचं काम झालंय. तुम्ही जाऊ शकता. बाहेर खूप लोक ताटकळत आहेत."
"संग्राम, एकदा तरी बोल ना..." तिने विनवणी केली.
संग्रामने शिपायाला बेल वाजवून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला, "ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस, तो तिथेच मेला. या खुर्चीवर जो बसलाय, तो फक्त एक अधिकारी आहे. आणि हो, जाताना गेटवरच्या वॉचमनला सलाम करून जा, कारण पाच वर्षांपूर्वी एका 'भिकारी' समजल्या जाणाऱ्या मुलामुळेच आज तुला ही सही मिळाली आहे."
सायली फाईल छातीशी धरून रडत केबिनबाहेर पडली. तिला आज कळलं होतं की, ती ज्याला दगड समजून सोडून गेली होती, तो खरं तर 'हिरा' होता, जो आता तिच्या नशिबात उरला नव्हता.

10/12/2025

काय बोलणार आता

10/12/2025

ही गोष्ट आहे चंदीगडमधील ५२ वर्षीय वीणा देवींची—ज्यांनी आयुष्याच्या सगळ्या कठीण वळणांना स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर वाकवून दाखवलं. शरीराला अर्धांगवायू झालेला… चालण्यासाठी काठीचा आधार… पण तरीही त्या सकाळपासून रात्रीपर्यंत Zepto च्या डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. एका ग्राहकाने त्यांचा छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि क्षणात तो व्हायरल झाला. कारण त्यात दिसत होती एक साधी डिलिव्हरी वर्कर नाही—तर आयुष्याशी प्रामाणिकपणे झुंज देणारी एक ताकदवान स्त्री.
वीणा देवी सांगतात की जून २०२४ पासून त्या डिलिव्हरीचे काम करत आहेत. त्यांच्या आवाजात तक्रारीचा सूर नाही; उलट त्या हसतमुखाने म्हणतात, “अर्धांगवायू आहे, पण काम तर करायलाच लागतं.” इतकं सोपं, प्रामाणिक आणि मनाला भिडणारं उत्तर… यामुळेच हजारो लोक त्यांना सलाम करत आहेत. व्हिडिओत जेव्हा त्यांना विचारलं गेलं, “लोकांनी तुम्हाला कशी मदत करायची?” तेव्हा त्या फक्त शांतपणे म्हणतात—“बस, सपोर्ट करत रहा.” एवढंच. संघर्ष मोठा, पण मनातली नम्रता त्याहूनही मोठी.
सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. कुणी लिहिलं—“काही लोक फक्त जगत नाहीत, तर जगण्याचं खरं अर्थ शिकवतात.” Zepto नेही अधिकृतपणे त्यांचं कौतुक करत “We are proud of her” असं म्हटलं. डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं दैनंदिन आयुष्य कठीण असतं—वेळेचं बंधन, उत्पन्नाची अनिश्चितता… पण वीणाताईंची कथा या सगळ्यांच्या संघर्षाला नवी प्रेरणा देते.
काठीचा आधार, अर्धांगवायूनं अडथळा आलेला पाय, आणि तरीही सतत धावत राहणारी स्कूटर—ही दृश्यं आज हजारोंना सांगत आहेत की “स्थिती कठीण असली तरी मनाची ताकद मोठी असते.” वीणाताईंचा प्रवास सांगतो की स्वाभिमान आणि मेहनत यांची किंमत कोणत्याही परिस्थितीपेक्षा मोठी असते.
त्यांची कथा म्हणजे केवळ प्रेरणा नाही; ती एक संदेश आहे—की अडचणी आपल्याला हरवत नाहीत, आपणच त्यांच्यासमोर किती मजबूत उभं राहतो हे महत्त्वाचं असतं.

28/11/2025

आपला भारत देश हा कांदा निर्यातीत 1 नंबर वरून 5 नंबर वर आला आहेत. या वरून एकच लक्षात येते की पाकिस्तान एवढा छोटा देश असून तो कांदा निर्यातीत 3 नंबर ला आहेत. आपल्या देशात शेतकरी कांदा पिकवत नाही असे नाही ये.

पहिल्यापासून आपल्या देशातील कांद्याला बाहेरील देशात कांद्याची गुणवत्ता आणि चवीलाही चांगला आहेत. यामुळे बाहेरील देशात आपल्या भारत देशातील कांद्याला पसंती होती. पण पण मागील 3 ते 4 वर्षांपासून आपल्या देशातील या राजकारण्याच्या धर सोडीच्या कांदा निर्यात धोरणामुळे समोरील कांदा आयात करणाऱ्या देशातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या देशांकडून कांदा मागवला आणि काही देशातील शेतकऱ्यांना तेथील सरकारने कांदा लागवड करण्यासाठी अनुदान देऊन स्वतःच्याच देशात कांदा पिकावण्यास सुरुवात केली. आपण ही कायम स्वरूपी एखाद्याकडून कोणतीही एखादी वस्तू खरेदी करत असलो आणि ती वस्तू आपल्याल्या दुसऱ्या वेळेस भेटली नाही तर आपण ती वस्तू दुसऱ्या दुकानातून घेतो. पण त्या दुकानदारावर अवलंबून राहत नाही. असेच आपल्या देशातील राजकारण्याच्या कांदा निर्यात चालू बंद करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात चालला आहेत. यामुळे आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहेत.

28/11/2025

संघर्षाने माखलेली माणसं जगण्याच्या तक्रारी जगासमोर मांडत नसतात !🌿🌾🧿💯❤️

#जीवनप्रवास #जगण

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune