White Army Co-Win Center
White Army Co-Win Center (Covid Care Center) started by the White Army. So far, 1,500 patients have been cured at this Center.
All these 1500 patients have been treated free of cost. Many facilities are provided to the patients in the center.
28/04/2024
सहर्ष स्वागत यावर्षीच्या बालसंस्कार शिबिर
28/04/2024
स्वागत आपल्या सर्वांचे यावर्षीच्या बालसंस्कार शिबिरामध्ये
झलक गेल्यावर्षीच्या संस्कार शिबिराची
व्हाईट आर्मी आयोजित समृद्ध भारत बालसंस्कार शिबिर ( बेसिक कॅम्प 1) 2 मे 2023 ते 12 मे 2023 या दहा दिवसाच्या समृद्ध भारत बाल संस्कार शिबिर (बेसिक कॅम्प 1) चे आयोजन व्हाईट आर्मी एनजीओ इन्स्टिट्.....
24/10/2023
*शंभर लोकांनी रक्तदान करून नवरात्रीचे सेवा अंबाबाई चरणी अर्पण......*
व्हाईट आर्मी व करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी हक्कदार श्री पूजक मंडळ संयुक्त विद्यमाने
गेले पंधरा वर्षे शारदीय नवरात्र उत्सव निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याहीवर्षी आज व उद्या (२४ व २५ ऑक्टो. २०२३) आयोजित करण्यात करण्यात आले आहे.
आज दसऱ्या च्या दिवशी शंभर लोकांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
आज सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री राहुल रेखावर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी देवस्थानचे सचिव बनसोडे राजवाड्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव देवस्थानचे व्यवस्थापक दिंडे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे प्रशांत शेंडे यांच्या उपस्थितीत झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराची रक्तदान करण्यास सुरुवात झाली यामध्ये देवस्थानचे सचिव देवस्थानचे सचिव श्री बनसोडे सर, पोलीस अधिकारी, तरुण मुले जे नुकतीच पहिल्यांदा रक्तदान केले असे महिला व पुरुष यांचा सहभाग त्याचबरोबर 63 वर्षाचे सरोजिनी जाधव, 55 वेळा रक्तदान करणारे अमृत मिरजकर यांनी रक्तदान करून सहभाग नोदविला. आजच्या रक्तदान शिबिरामध्ये वरील विशेष याबरोबर गुजरात ते कर्नाटक, चिकमंगळूर, हुबळी, बेळगाव, महाराष्ट्र, नागपूर ते जळगाव नंदुरबार, बार्शी, लातूर येथून प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापूर सांगली साताऱ्यातील श्री अंबाबाईच्या दर्शनात आलेले भक्त सेवक वर्ग तसेच व्हाईट आर्मीचे जवान यांनी रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपली नवरात्रीचे सेवा सांगता करण्यात आली.
आज रक्तदान शिबिरा विशेष माननीय युवराज यशराज भोसले यांनी भेट दिली यांच्या हस्ते नवरात्र काळात सेवा देणाऱ्या भक्तांचा प्रमुख रायगड उत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत देवस्थान सीसीटीव्हीचे प्रमुख राहुल जगताप देवीचे पायघड्या सेवा करणारे संदीप दोशी शैलेश बांदेकर सत्कार यांचा सत्कार करण्यात आला.
आजच्या रक्त संकलन छत्रपती प्रमिलाराजे सीपीआर हॉस्पिटल व अर्पण ब्लड बँक यांच्या व्यवस्थापनेखाली करण्यात आले.
*13 ऑक्टोबर*
*आज जागतिक आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जगामध्ये नैसर्गिक व मानव निर्मिती आपत्तीमुळे होणारे मनुष्यहानी वित्तहानी व जैवविविधता व निसर्गाचे हानी याचे भविष्यामध्ये होणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करणे यासाठी आजचा दिवस*
जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिन म्हणून साजरा केला जातो मनुष्य प्राण्यांमध्ये अतिप्रगत सुख सुविधा शोधणे व त्याचे स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा बळी देऊन केलेल्या प्रगतीचा हट्टस हाच त्याच्या किंवा मनुष्यप्राण्याच्या त्याच्यासोबत निसर्गाचा सहित संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होण्याच्या मार्गावर आज पृथ्वी वेगवेगळ्या आपत्तीमध्ये ग्रासून विध्वंसक बनत आहे याला मूळच कारणीभूत मनुष्यच असे म्हणा लागेल गेल्या पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासून ते आज अखेर चाललेले विध्वंसक अस्त्रे असोत निसर्गाचे मार्ग तोडून
वेगवेगळे उभारलेले प्रोजेक्ट असतील किंवा मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे सुविधांचे वापर निश्चितपणे जर आपण वेळीच जागे नाही झालो तर भविष्य किंवा भविष्यात येणाऱ्या प्रत्येक मानव निसर्गातील जीव जंतूंना जगण्यासाठी धडपडत राहावे लागेल एका बाजूने हिमनद्या वितळत चालू आहेत दुसरीकडे उष्माघात वाढत आहे तिसरीकडे महामारी पसरत आहे पृथ्वीच्या आवरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे ह्या येणाऱ्या जणूकाही मनुष्याचा जीवन जगण्याचा आरसा दाखवत आहे आता तरी आपण शहाणपण किंवा शहाणे होणार का हा ?
अशोक रोकडे
व्हाईट आर्मी
इंटरनॅशनल (NGO)
29/07/2023
*काळीज पिळवटून टाकणाऱ्या इर्शाळवाडी घटनेची माहीत नसलेली गोष्ट | White Army Kolhapur*
https://youtu.be/KgUgccE5KVk
नवनवीन अपडेट साठी आताच ग्रुप मध्ये सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/G5W42f4aJgsAQVgagInfdx
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 885 584 0024
काळीज पिळवटून टाकणाऱ्या इर्शाळवाडी घटनेची माहीत नसलेली गोष्ट | White Army Kolhapur काळीज पिळवटून टाकणाऱ्या इर्शाळवाडी घटनेची माहीत नसलेली गोष्ट | White Army Kolhapur ...
*मनुष्य मृत्यू इतका स्वस्त*
*मोरबीच्या* दुर्घटनेनंतर पुन्हा आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट चा विषय ढवळून निघाला.
एखादी दुर्घटना होणे त्याची तीव्रता लहान असो किंवा मोठे त्यानंतर जर लहान असेल तर सर्व लोक विसरून जातात.पण मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली तर लोक चर्चा करतात. थोड्या दिवसांनी विसरून जाते सरकार देखील याच पावलावर पाऊल टाकत डिझास्टर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यावर एक कमिटी नेमले जाते आणि त्याच्यावर एक आयोगामार्फत की आपत्ती व्यवस्थापन ठरवलं जाते. असेच काळ ढकलत गेला की पुन्हा तोच विषय पाच दहा वर्षानंतर आणि परतच पुन्हा पुन्हा आपत्ती व्यवस्थापन असा विषय होत राहतो या देशांमध्ये कोणालाही काही पडलेले नाही कारण असा आहे की वेळ मारून घेणे सध्याची वेळ मारणे आणि यामध्ये प्रामुख्याने असा जाणवतो की माणसाच्या जीवाशी काही किंमतच राहिले नाही
ज्या वेळेला अशा मोठ्या घटना घडली जाते त्याच वेळेला प्रशासनाकडून त्या लोकांना आर्थिक मदत दिली जाते व त्यांचे तोंड बंद केले जाते.
140 वर्षाचा जुना जुना पूल एका राजाने राजधानी मध्ये आपल्या ब्रिटिशकालीन असा पूल असावा या हेतूने आपल्या राज्यात बांधला गेलेला पूल झुलतापूर पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी आणि राजाचा येण्या जाण्याचा तो फुलाचा वापर त्यानंतर प्रशासनाने स्वातंत्र्यानंतर या पुलाचा वापर बरेच वर्ष त्याची लाईफ संपल्यानंतर देखील करत राहिले आता या पुलावर लोक पर्यटनासाठी जातात किंवा एक या पुलाचा वर जाण्याने या पुलावर जाण्याने एक एक स्वर्गीय आनंद असा अल्हाददायक वातावरण त्या ठिकाणी मिळते या पोटी लोक या ठिकाणी जातात आणि त्याचं देखील या ठिकाणी पैशाचं रूपात ते पर्यटनाचे लाभ घेतात पण प्रशासन जुना पूल आहे 140 वर्षे आहे त्याची कॅपॅसिटी क्षमता किती आहे की तो बराच काळ बंद होता आणि परत त्याचे डागडी करून ह्या पद्धतीने आपण जुन्या पुलाचा जर त्याचे लाईफ बद्दल अभ्यास न करता त्या पुलाला नाव ठेवणे हे चुकीच आहे पण त्याचा पुढच्या भविष्यात 140 वर्षानंतर नवीन पिढी वापरणे योग्य आहे का नाही हे देखील तात्कालीन सरकारने पाहणं किंवा स्थानिक प्रशासन पाहणं किंवा ते सर्वस्वी सर्व लोक त्या त्या शहराच्या कलेक्टरच्या आपत्ती व्यवस्थापन चा विभागाचा हा प्रश्न आहे
ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते एक प्रसारमाध्यमानातून वृत्त प्रसारणातून एक भावनिक प्रश्न निर्माण होतो व त्याला देखील त्या वेळे पुरतं झुकते माप प्रशासनाकडून दिले जाते पण या गोष्टी आजच घडल्यात अशा नाही कोण कुंडलम मध्ये एका शाळेच्या किचनमध्ये आग लागल्याने बरेच मुलं त्या ठिकाणी होरपळली गेले त्यावेळेला स्कूल सेफ्टी आपत्ती व्यवस्थापन हा विषय आपत्ती व्यवस्थापन स्कूल सेफ्टी प्रोग्रॅम किंवा शाळेचे आपत्ती व्यवस्थापन एखाद्या यात्रा सातारा (मांढरदेवी )यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली त्यात 284 लोक चेंगराचेंगरी मध्ये मृत्युमुखी पडले आणि पुन्हा यात्रेचा आपत्ती व्यवस्थापन हा विषय ऐरणीवर आला आणि यात्रा आपत्ती व्यवस्थापन या समितीची गठन झाली त्याचबरोबर रायगड महाड येथील सावित्री नदी वरील पूल वाहून गेला आणि त्या रात्रीच्या अंधारात त्या पुलावरून अनेक वाहने त्या सावित्रीच्या नदीत त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आणि मग शासन जागे झाले की जेवढे आपल्या देशामध्ये पूल आहे त्याचं ऑडिट व्हावं आणि आपत्ती व्यवस्थापन पुलाचं करावं दरवेळेला एखादी रेल्वेची घटना घडेल किंवा जुन्या मोठ्या इमारती कालांतराने पडतात किंवा मोठ्या प्रमाणात स्फोट होतो किंवा एखादी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागते मग या दुर्घटनेमध्ये जर मनुष्य आणि मोठ्या प्रमाणात झाली की मग आपलं सरकार त्यावर आपत्ती व्यवस्थापन समिती नेमली जाते ह्या गोष्टी आपण एखादी आपत्ती आल्यावरच आपत्ती व्यवस्थापन मरमत त्यावर करण्यासाठी कमिटी नेमले जात आणि दोन-तीन वर्ष चार-पाच वर्षानंतर पुन्हाच अशीच आपत्ती त्यांनी त्यावर काहीच एक भावनिक प्रश्न पुन्हा निर्माण होतो आणि ते पुन्हा कुठल्यातरी पैशाच्या रूपाने लोकांना आर्थिक मदतीच्या रूपान तोंड बंद केली जातात आणि लोक देखील की विचार करतात की बाबा आता आपण काय असणार आपल्याजवळ जी व्यक्ती गेली ती गेली पण आर्थिक सोडत आपल्याला मिळालं एवढ्यावर समाधान मानून गप बसते आणि आपण पुढे जातो पण असा कोण विचार करत नाही की आज आपल्यावर असं प्रसंग आले की पुन्हा असा प्रसंग समाजातील प्रत्येक घटकावर येऊ शकतो आणि हे ह्या अशाच गोष्टी अशाच नियोजनाशून्यातून वेळ मारून घेणे कितपत योग्य आहे आज आपल्या देशामध्ये या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आपत्तीत एखादं संकट आल्यानंतरच आपण ज्या पद्धतीने एखादी कमिटी नेमतो आणि त्याच्यावर चर्चा करून परत दुसऱ्या आपत्ती येते पण जुन्या आपत्ती पण विसरून जातो यावर कायम काहीतरी ठोस नियोजनात्मक देशाच्या घटनेत वरिष्ठ पातळीवर नियमन गरज वाटते नाहीतर या देशांमध्ये मनुष्य च्या मृत्यूला जनावराचा मृत्यूचीत तुलना होऊ शकेल एक दिवस
02.11.22
अशोक रोकडे
White Army (NGO)
International
([email protected])
'वीर जवान अभिजित सुर्यवंशी स्मृतिदिन' आणि 'जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी च्या' २२ व्या वर्धापनदिना निमित्य, "श्रद्धा-दिप प्रज्वलन सोहळा" काल ऐतिहासिक बिंदू चौक येथे संपन्न झाला, त्याचे काही क्षण . . .
आयोजक,
श्री अशोक रोकडे
संस्थापक, अध्यक्ष
व्हाईट आर्मी
25/12/2021
वाफ घेण्याची पद्धत . . .
सध्या कोरोना बरोबरच सर्दी, नाक गच्च होणे, छाती भरणे, डोके गच्च होणे अशा इतर आजारांचे ही भरपूर लक्षणे सर्वत्र आढळून येत आहेत. त्यासाठी प्रत्येक वेळी औषधांचा मारा उपयोगी ठरेल असे नाही. किती औषध घ्यायची यालाही नियम आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने वाफ घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही शास्त्रीय नियम पाळून वाफ घेतल्यास, त्याची उपचारासाठी खूप चांगली मदत होते.
१) प्रथमतः वाफेचे मशीन जे ब्युटी पार्लर मध्ये फेशियलसाठी वापरतात. त्यामध्ये पूर्ण डोळ्या खालचा भाग, नाक, तोंड, हनुवटी पर्यंतचा भाग व्यापला जाईल अशा पद्धतीने वाफ देतात. असे वाफेचे मशीन घ्यावे. नंतर त्यात सांगितलेल्या पद्धतीने पाणी घालून व गरजेनुसार दोन ते पाच थेंब निलगिरी तेलाचे किंवा विक्स किंवा अमृतांजन टाकावे.
२) मशीन चालू करून वाफ येऊ द्यावी. डोळे मिटून येणारी वाफ नाक तोंड याद्वारे मोठ्याने आत बाहेर घ्यावे. सुरुवातीला 30 ते 40 सेकंद नंतर एक मिनिट पर्यंत घ्यावी.
३) मशीन बंद करून एक दोन मिनिट थांबावे परत वरील प्रमाणे एक मिनिट वाफ घ्यावी, असे गरजेनुसार पाच ते दहा वेळा करावे. ही झाली एक वेळेची वाफ. अशी आवर्तने पहाटे, सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान , संध्याकाळी पाच ते सहा आणि रात्री असे दिवसातून चार वेळा घ्यावेत. यामुळे घशातील कफ मोकळा होतो. घसा नाक स्वच्छ होतो.
अगदी लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, डोळ्यांचे आजार असलेले व इतर चेहऱ्याचे आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखात्री अशाप्रकारे वाफ घ्यावी.
(*टिप - मशीन कोणत्याही मेडिकल दुकानात मिळते. नसेल तर घरी एका भांड्यात गरम पाणी करून,अशी वाफ घेता येईल.)
श्री.अशोक रोकडे,
व्हाईट आर्मी,
जैन बोर्डिंग कोविड सेंटर,
दसरा चौक, कोल्हापूर,
मो. नं. ९८५००७९८०१
निमंत्रण . . . . प्रत्येक भारतीयाला,
निमंत्रण . . . . या भूमीचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला,
निमंत्रण . . . . . शहिदांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा असणाऱ्याला,
निमंत्रण . . . . . नैसर्गिक आपत्तीत उध्वस्त झालेल्या बांधवांविषयी आपुलकी असणाऱ्या प्रत्येकाला . . .
वीर जवान अभिजित सुर्यवंशी स्मृतिदिन आणि जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्य,
"श्रद्धा-दिप प्रज्वलन"
दि. २५ डिसेम्बर २०२१ रोजी सायं. ६.३० वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथे कोरोना काळातील कोविड योद्धा यांच्या हस्ते होणार आहे.
आयोजक,
श्री अशोक रोकडे
संस्थापक, अध्यक्ष
व्हाईट आर्मी
24/12/2021
निमंत्रण-
वीर जवान अभिजित सुर्यवंशी स्मृतिदिन आणि जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्य,
"श्रद्धा-दिप प्रज्वलन"
दि. २५ डिसेम्बर २०२१ रोजी सायं. ६.३० वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथे कोरोना काळातील कोविड योद्धा यांच्या हस्ते होणार आहे.
आयोजक,
श्री अशोक रोकडे
संस्थापक, अध्यक्ष
व्हाईट आर्मी
10/09/2021
GANESH CHATURTHI
https://www.facebook.com/WhiteArmyCoWinCenter
Jay hind
Do for Nation Die for Nation
Thank you
05/09/2021
WHITE ARMY wishes Happy Teacher's Day
https://www.facebook.com/WhiteArmyCoWinCenter
Jay hind
Do for Nation Die for Nation
Thank you
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the practice
Telephone
Website
Address
Jain Digambar Boarding, Dasara Chowk
Kolhapur
416001