Dhadakebaaz

Dhadakebaaz

Share

राजकारण, समाजकारण,औद्योगिक क्षेत्र , खेळ , मनोरंजन आणि विविध ताज्या घडामोडींसाठी

31/05/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 134 व्या भागात देशवासियांना संबोधित करताना सध्याच्या अनेक चालू घडामोडींवर विषयांवर चर्चा केली.

या दरम्यान त्यांनी भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि त्यांनी मिळवलेले यश, उन्हाळ्याच्या दिवसांत पारंपरिक पेय पदार्थांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता यांसारख्या मुद्द्यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला!...

31/05/2026
31/05/2026

माकडाने पळवली लाखांची बॅग; झाडावरून पडला 500 च्या नोटांचा पाऊस! बघा व्हिडिओ!
नेमकं प्रकार काय? पूर्ण बातमीची लिंक कमेंट मध्ये आहे रे भाऊ क्लिक करून बघ.....

31/05/2026

लाखाची बॅग' आणि 'माकडाची गम्मत'! झाडावरून पडला ५०० च्या नोटांचा पाऊस, उडाली एकाच खळबळ!बघा व्हिडिओ!

30/05/2026

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. भर उन्हात जरांगे आंदोलनस्थळी ठामपणे बसले आहेत. सरकारकडून हे आंदोलन मागे घ्यावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड गेल्या दोन दिवसांपासून जरांगे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. मात्र अजूनही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनीही सरकारवर टीका करत घरचा आहेर दिल्याने या आंदोलनाची आणखी चर्चा रंगली आहे.

30/05/2026

नवरा श्रीमंत नको... स्वतः करोडो कमवण्याचं स्वप्न!"
"मला श्रीमंत नवरा नकोय..."
इन्फ्लुएंसर तान्या मित्तलचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. तिचं म्हणणं आहे की, तिला असा नवरा पाहिजे जो रोज सकाळी उठून 10-15 लाख रुपये मागेल अन् तिची स्वतःची एवढी लायकी असावी की ती त्याला 15-20 लाख रुपये काढून देऊ शकेल!

आता या वक्तव्यावरून इंटरनेटवर दोन गट पडलेत... काही जण याला महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा कडक अ‍ॅटिट्युड म्हणतायत, तर काही जण याला हवेतील विचार सांगतायत.
तुमचं काय मत आहे? तान्या मित्तलचे हे विचार खरंच प्रेरणा देणारे आहेत की फक्त व्हायरल होण्याचा एक मार्ग? कमेंट करून नक्की सांगा.

29/05/2026

बद्रीनाथ धाम येथे कथेदरम्यान बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, पेपर लीकची शिक्षा विद्यार्थ्यांना नाही, तर व्यवस्थेला मिळाली पाहिजे!..

तुमचे या वक्तव्याबद्दल मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा!....

29/05/2026

देशात एकीकडे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत'च्या मोठ्या घोषणा होत असताना, दुसरीकडे मात्र सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकताच एका एक्सप्रेसवेवरील कथित निकृष्ट कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या खालच्या बाजूला सिमेंट काँक्रीटचा थातूरमातूर थर आणि त्यावर तांत्रिक निकष न पाळता थेट डांबराचा थर टाकल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे हे काम नेमक्या कोणत्या नियमांनुसार झाले, कामाची गुणवत्ता तपासली गेली होती का आणि संबंधित विभागाने याची पाहणी केली होती का, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जर हे काम दर्जेदार आणि प्रामाणिकपणे झाले असेल, तर एवढ्या कमी कालावधीत रस्त्याची अशी दैनावस्था कशी होऊ शकते? आणि जर कामात हलगर्जीपणा किंवा कथित भ्रष्टाचार झाला असेल, तर यासाठी नक्की जबाबदार कोण? केवळ नफा कमावणारा कंत्राटदार, कामाकडे डोळेझाक करणारे देखरेख अधिकारी, की संपूर्ण प्रशासन, असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे!...



हा प्रश्न केवळ रस्त्याच्या दर्जापुरता मर्यादित नसून तो थेट नागरिकांच्या जिवाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे या एक्सप्रेसवेवर अनेक किलोमीटरपर्यंत कोणतीही वस्ती नाही आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नाहीत. अशा निर्जन ठिकाणी रस्त्यातील त्रुटींमुळे किंवा निकृष्ट बांधकामामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे.

29/05/2026

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! जून महिन्यात 'या' राज्यांमध्ये तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण List.....

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Pune